Saturday, May 22, 2010

प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी आपले असते, दुखा:त जरी रडलो तरी, सुखात हास्य असते !!विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो, ग्रीष्मात जरी उकडलो तरी, पहिल्या पावसात गारवा असतो... !!

आंबा खातांना, लिहित होतो चारोळी! ठसका लागला आणि, घशात अड़कली आठोळी!!

गोट्या : काय हो तुमच्या कडे "मारुती" चे स्पेअर पार्ट्स विकत मिळतात का??दुकानदार : हो...गोट्या : मग मला एक "गदा" द्या...

कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुडला नाही येत. का बरे ?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे..

घन बरसतात...मन तरसतात... काही गोष्टी आठवतात...काही विसराव्याशा वाटतात...मनातील शब्दाँना वाटा फुटतात.पण अश्रु डोळयातच गोठतात.पाऊस तोच...भावनाही त्याच... खंत एकच...कोनाचीतरी कमी.



आपल्या संस्कृतीत शुभमुहूर्त साडेतीन, आज अक्षय तृतीया. संवत्सरातील साडेतीन मुहूर्तांपैकी अखेरचा पण अर्धा. 'ऋतूंचा कुसुमाकर' वसंत ऋतू व चित्रविचित्र अशा सृष्टी सौंदर्याने नटलेला चैत्राच्या सांगतेचा दिवस म्हणजे अक्षयतृतीया...!! अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

0 comments: