Showing posts with label fb share. Show all posts
Showing posts with label fb share. Show all posts

Saturday, July 23, 2022

post 6

“Summarizing the immediate action points for the party, Savarkar concluded:

(a)To secure entry for as many Hindu recruits as possible into the army, navy and the air forces.
(b)To utilize all facilities that are being thrown open to get our people trained into military and mechanical manufacture of up-to-date war materials.
(c)To try to make military training compulsory in colleges and high schools.

(d)To intensify the organization of the Ram Sena.
(e)To join the civic guard movement with a view to enable to defend our own people?against foreign invasion or internal anarchy, provided always that the civic guards are not used against any patriotic political movements in India or in any activities detrimental to the legitimate interests of the Hindus. 
(f)To start new industries on large scales to capture the market where foreign articles to defeat the entry of new foreign competitors.
(g)To boycott foreign articles to defeat the entry of new foreign competitors.
(h)To set on foot an all-India movement to secure the correct registration, in the coming Census, of the popular strength of the Hindus including Tribal Hindus such as Santhals, Gonds, Bhils, etc., and to secure their enlistment as Hindus instead of as Animists or Hill Tribes and by taking every other step necessary to secure the object in view.”

Savarkar (Part 2): A Contested Legacy, 1924-1966
Vikram Sampath


post 4

“Summarizing the immediate action points for the party, Savarkar concluded:

(a)To secure entry for as many Hindu recruits as possible into the army, navy and the air forces.
(b)To utilize all facilities that are being thrown open to get our people trained into military and mechanical manufacture of up-to-date war materials.
(c)To try to make military training compulsory in colleges and high schools.

(d)To intensify the organization of the Ram Sena.
(e)To join the civic guard movement with a view to enable to defend our own people?against foreign invasion or internal anarchy, provided always that the civic guards are not used against any patriotic political movements in India or in any activities detrimental to the legitimate interests of the Hindus. 
(f)To start new industries on large scales to capture the market where foreign articles to defeat the entry of new foreign competitors.
(g)To boycott foreign articles to defeat the entry of new foreign competitors.
(h)To set on foot an all-India movement to secure the correct registration, in the coming Census, of the popular strength of the Hindus including Tribal Hindus such as Santhals, Gonds, Bhils, etc., and to secure their enlistment as Hindus instead of as Animists or Hill Tribes and by taking every other step necessary to secure the object in view.”

Savarkar (Part 2): A Contested Legacy, 1924-1966
Vikram Sampath

post 2

  एक धनी जाऊन दुसरा यावा अशी हिंदूंची इच्छा नाही. हिंदुस्थानच्या सीमेत जन्मला म्हणून एडवर्डचे जागी औरंगजेब आणावा येवढयासाठी लढा, युध्द करुन प्राण देण्यास हिंदू सिध्द झालेले नाहीत. यापुढे स्वत:च्या भूमीवर, स्वत:च्या घरात, स्वत:च स्वामी व्हावे अशी हिंदूंची इच्छा आहे.

post 1

“Even the so-called nationalist Muslim leaders of the Congress like Maulana Azad say openly that they will not compromise on the interests of Muslims in India. Have you heard any Hindu leader talk about Hindu interests so openly? If a Hindu starts speaking like this, the Congress will start calling him communal. Isn’t this unfair?

Savarkar in 1940 in South India 

Savarkar (Part 2): A Contested Legacy, 1924-1966
Vikram Sampath

Sunday, June 19, 2022

post 2

कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे नवीन पुस्तक ‘मराठीतील काव्यरंग - -एक समीक्षात्मक अध्ययन’
लेखक- श्रीनिवास हवालदार
********************************************************************
- ओळख-
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश
- सुधीर मोघे
मराठी साहित्यातील गूढरम्य कवी ग्रेसच्या १७० कविता दोन पुस्तकांच्या माध्यमाने ‘धुक्यातून प्रकाशाकडे’ आणल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की ग्रेसच्या कविता सखोल विश्लेषण करून रसिकांसमोर आणण्याचे साहस तर अन्य समीक्षकांनी केले नाहीच परंतु बा.सी.मर्ढेकर, आरती प्रभू, बालकवी, ‘बी’ इत्यादी कवींच्या कवितांचे काही समीक्षकांनी केलेले विश्लेषणही कवींच्या अभिप्रेत भावांशी जुळणारे नाही.काही प्रथितयश समीक्षक त्यांच्या कवितांच्या भोवती घिरट्या घालत बसले आणि काहींने तर अर्थ निर्णयात विक्षिप्ततेची सीमा गाठली.कविततेचे संदर्भ आणि अभिप्रेत प्रतिमांची उकल ना झाल्यामुळे असे प्रसंग उद्भवणे अपरिहार्य होते.
माझ्या मते कवितेतील गूढता चांगल्या कवितेचे एक वैशिष्ट्य असते.आनंदवर्धन या भारतीय साहित्यशास्त्रज्ञाने इ.स.च्या ११व्या शतकात ' ध्वनिआत्मा काव्यस्य' म्हणजे ध्वनि हाच काव्याचा आत्मा आहे हा सिद्धांत मांडला.वाच्यार्थाच्या पलीकडील व्यंग्यार्थ हाच ध्वनि असून त्याने ध्वनि हाच श्रेष्ठ काव्याचा निकष मानला आहे.त्याची ध्वनि ही काव्यातील अर्थाचा अर्थ अशा व्यंग्यार्थ संकल्पनेशी संबंधित आहे.याचे स्पष्टीकरण करताना आनंदवर्धनाने उदाहरण दिले आहे की ज्या प्रमाणे स्त्रीच्या ठिकाणी तिच्या शरीराहून वेगळे असे लावण्य दिसून येते त्या प्रमाणेच महाकवींच्या काव्यात वाच्यार्थाहून वेगळा असा अर्थ प्रतीयमान किंवा व्यंग्यार्थ असतो.आनंदवर्धंनाच्या मते या ध्वनीचा प्रत्यय येण्यासाठी रसिकाजवळ विशिष्ट प्रकारची योग्यता लागते.केवळ शब्दार्थ ज्ञानाने तो कळत नाही.त्यासाठी वाचक काव्यार्थ तत्वज्ञ हवा.कवीला महाकवित्व मिळते ते या ध्वनीच्या उचित वापरामुळेच.
कवी ग्रेस हेच तथ्य काही निराळ्या शब्दात असे मांडतात "जीवन,निसर्ग आणि अध्यात्मसत्ता यातील कोणत्याही अनुभवाच्या चक्रव्यूहात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेशकर्त्याजवळ त्या अनुभवात प्रवेश करण्याची एक प्रकारची किमान इयत्ता लागत असते आणि यालाच मी प्रवेशपत्रिका म्हणतो. केवळ इच्छा, लहर म्हणून अशी प्रवेशपत्रिका कुठल्याही अनुभवधारकाला स्वतःजवळ बाळगता येत नाही.एखाद्या कैफात, एखाद्या पोटतिडिकीच्या आविर्भावात अशी पत्रिका अळेबळे घेऊन जर अनुभवधारक त्या अनुभवात शिरला तर त्याच्यावर तो ओढवलेला, त्याने ओढवून घेतलेला दुरापास्त प्रसंगच म्हटला पाहिजे.”
या बाबतीत मर्ढेकरांसंबंधी ही आठवण प्रसिद्ध आहे.श्री.पु.भागवतांनी एकदा गप्पा मारताना मर्ढेकरांना विचारले तुमची ‘झोपलीं ग खुळीं बाळें ' ही कविता मला नीटशी कळली नाही.ती कशाबद्दल आहे? त्यावेळी मर्ढेकर नुसतेच ’ हूं' करून थांबले नाहीत.त्यांनी एका संपूर्ण वाक्यात उत्तर दिले! म्हणाले, “Then the poem does not exist for you at all !”
साहित्य समीक्षा सामान्यतः प्रात्यक्षिक समीक्षा अथवा सूक्ष्म विश्लेषण, सैद्धांतिक समीक्षा आणि वाङ्मयीन ऐतिहासिक समीक्षा या तीन वर्गात विभक्त केली जाते.दुर्बोध, गूढ अथवा गूढतेच्या सीमारेषे वर असणाऱ्या कविता सामान्य रसिकांस सुबोध करण्यासाठी मला प्रात्यक्षिक समीक्षा अथवा सूक्ष्म विश्लेषण करणे हाच एक योग्य मार्ग वाटतो.सैद्धांतिक समीक्षा आणि वाङ्मयीन ऐतिहासिक समीक्षा हे प्रकार शैक्षणिक[ Academic] असल्यामुळे सर्वसामान्य रसिक वर्गासाठी उपयुक्त नाहीत आणि कविता समजल्याशिवाय अनुभवण्याचा आव आणणे ही तर निव्वळ पळवाट आहे कारण निर्मिति करणारा कलाकार केवळ अनुभवण्यासाठी निर्मिति करत नसतो.त्याला आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात.
गूढ किंवा गूढतेच्या सीमारेखेवर असलेल्या कविता सामान्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम चोखंदळ समीक्षकांचे आहे.या बाबतीत त्यांची भूमिका कवी आणि रसिक यांच्यातील सेतुबंधाची आहे.एका लेखकाने साहित्य समीक्षकांसाठी प्रस्तावित केलेली खालील आचार संहिता मला उपयुक्त वाटते परंतु दुर्दैवाने ह्याचे पालन फार कमी समीक्षकांनी केले आहे आणि त्यामुळे काही मूळ निर्मितीकारांचे साहित्य विकृत अवस्थेत सामान्य वाचकांपर्यंत पोहोचून ते अधिकच दुर्बोध झाले आहे:
“A critic must have a sound commonsense and clear thinking in order to judge or evaluate the works of literature in an efficient way. He is well-read person to exercise judgment on literary works in a way as it should be. He must know the fact that to understand the works of literature; he needs to put himself in the place of a writer so to that he can appraise the work from the viewpoint of a writer as well. In order that the excellence or shortcomings may be examined properly, he does not preform opinion, but interprets literary values on the basis of his knowledge and experience without an aggressive and unreasonable belief or without any prejudice.”
या पुस्तकात गूढ अथवा गूढतेच्या सीमा रेषेवर असणाऱ्या ज्या रम्य कवितांचे विश्लेषण केले आहे त्यांची पृष्ठभूमि प्रस्तुत करणे उपयुक्त होईल.
केशवसुतांनंतरचे मराठी साहित्यातील एक युगप्रवर्तक कवी म्हणून बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर१, १९०९-मार्च२०, १९५६) यांचा उल्लेख केला जातो.त्यांनी कवितेची पूर्वपरंपरा मोडून तिला नवीन दिशा देण्याचे काम केले.कविते प्रमाणेच समीक्षा, कादंबरी, नाटक या प्रांतांतही त्यांनी महत्वाचे योगदान केले. मर्ढेकरांची कविता ही नवकविता किंवा नवकाव्य म्हणून ओळखली जाते.त्यांनी परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला हे त्यांच्या काव्यातील आशय आणि दुरूह असल्याचे कारणही आहे परंतु त्यांची नवकविता पूर्व परंपरेशी दुभंगून न राहाता अनेक ठिकाणी अभंग आणि ओवी ह्या प्राचीन मराठी रचनाप्रकारात आपल्या समोर येते. संतकवितेतील सांसारिक वैफल्य आणि अर्थशून्यता आधुनिक यंत्रयुगात आणि जगातील विज्ञान प्रगतीच्या संदर्भातही किती खोलवर रुजली आहे याची प्रचीती त्यांच्या नवकवितेत प्रकर्षाने येते.
त्यांच्या' शिशिरागम' या कवितासंग्रहातल्या कविता सुबोध आहेत परंतु नंतरच्या लेखनकालातील ' काही कविता' आणि' 'आणखी काही कविता‘तील अनेक कविता अत्यधिक गूढ असून त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही घटनांशी, व्दितीय महायुद्धाशी, मानवनाशास कारणीभूत विज्ञानाच्या दुरुपयोगाशी, माणसाच्या अज्ञानमूलक धारणांशी आणि काही अध्यात्म विषयक संकल्पनांशी संबंधित आहेत.या पुस्तकात त्यांच्या १८ कविता सम्मिलित करून त्या सर्व कवितांवर नवीन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.विशेष म्हणजे मराठी साहित्यक्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या ‘पिपात मेले ओल्या उंदिर ' या कवितेचे विस्तृत आणि सखोल विश्लेषण नवीन संदर्भात केले आहे. प्रसिद्ध अष्टपैलू साहित्यक प्रल्हाद केशव अत्रे यांनी या कविते बद्दल म्हटले होते "मर्ढेकरांची पिपांत मेले ओल्या उंदीर' ह्या कवितेचा प्रत्यक्ष परमेश्वराला तरी अर्थ लावता येईल का? उंदीर ते काय,ते बिळात कां जगले, पिपात कशाला न्हाले अन उचकी देऊन कां मेले? आणि मेले तर मेले!त्यांची दुर्गंधी इतक्या रसिकतेने हुंगीत बसण्याचे कवीला काय कारण? ह्याच ह्या पिपात मेलेल्या उंदरांच्या पाठीवर बसून नवकाव्याचा प्लेग आपल्या महाराष्ट्रात आला"
.“जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे” अशी श्रद्धा व धारणा ठेवणारे पुरुषोत्तम शिवराम रेगे [२ ऑगस्ट, १९१०- १७ फेब्रुवारी,१९७८] हे मराठी लेखक, कवी व नाटककार होते.पु.शि.रेगे यांनी स्वतः म्हटलंय की ‘जीवनात विविध रूपांनी वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषत: तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप त्यांच्या कविमनाला मोहवीत आले आहे.‘त्रिधा राधा’ ही रेग्यांची प्रसिद्ध कविता या पुस्तकात सम्मिलित केली आहे.
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (मार्च ८, इ.स.१९३०-एप्रिल २६, इ.स.१९७६) एक अग्रगण्य कवी आणि लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार यांना आर्ततेच्या शोधातला एक शब्दयात्री म्हणतात. ही आर्तता त्यांच्याच शब्दात अशी व्यक्त झाली आहे:
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.
त्यांनी ‘जोगवा’, ‘ दिवेलागण’,‘ नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातल्या कवितेतून अनेक उत्कृष्ट कविता लिहिल्या.त्यांच्या ‘गेले द्यायचे राहून, ‘ती येते आणिक जाते, ‘समईच्या शुभ्र कळ्या’ ‘तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी’ या संगीतबद्ध झालेल्या आणि रसिकांत प्रिय असणाऱ्या कविता गूढतेच्या आवरणात असून समजण्यास थोड्या कठिण असल्यामुळे मी या पुस्तकात सम्मिलित केल्या आहेत.
कवी बा.भ.बोरकर (३० नोव्हेंबर १९१०- ८ जुलै १९८४) यांना सर्व महाराष्ट्र 'आनंदयात्री कवी' म्हणून ओळखतो.त्यांच्या कवितात पसरलेल्या निसर्गाच्या देखण्या लावण्यात ठिकठिकाणी सृष्टीत भरलेल्या सौंदर्याची अनुभूती होते परंतु हा निसर्ग मानवासाठी लौकिक पातळीवर निर्हेतुक प्रेम आणि समर्पणाच्या भावनेचा संदेश घेऊन येतो.त्यांच्या काही आशयघन कवितांचे विश्लेषण आपणास आवडेल.
कवि ग्रेस [१० मे १९३७-२६ मार्च २०१२] यांच्या १७० गूढरम्य कवितांचे रसग्रहण २०१४ आणि २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे’ पुस्तकाच्या दोन खंडात मी केले होते.ग्रेसच्या काही प्रातिनिधिक नवीन कविताही या पुस्तकात आपणास सापडतील.
बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे [१३ ऑगस्ट १८९०- ५ मे १९१८]’ फुलराणी’, ‘निर्झरास, ‘आनंदी आनंद गडे, ‘श्रावणमास, ‘औदुंबर’ अशा अनेक कविता लिहून निसर्गाच्या सुंदर निराळ्या विश्वात वावरणारे आणि रसिकांना ही भूल पाडणारे बालकवी यांच्या ' औदुंबर' या कवितेवर अनेक समीक्षा झाल्या आहेत.या कवितेने अनेक वर्षानंतर ही आपले आकर्षण कायम ठेवले आहे.ही विख्यात कविता लोकप्रिय तर आहेच परंतु एक अतिशय समीक्षकप्रिय कविता आहे.प्रा.एस एस नाडकर्णी यांनी बालकवींच्या या कवितेवर अनेक समीक्षकांनी लिहिलेल्या ‘समीक्षांवर’ एक संपादित पुस्तकच लिहिले आहे.काही समीक्षकांनी पांढरी वाट म्हणजे गोरीपान स्त्री वा विधवा, औदुंबर म्हणजे सन्यस्त योगी,क्रीडामग्न बालक, प्रेयसीची प्रतीक्षा करणारा पुरुष आणि प्रियकराकडे संकेत स्थानी भेटायला निघाली विधवा स्त्री किंवा समाजाला झिडकारून बेभान करून डोहात विलीन होणाऱ्या प्रेमिकेची कहाणी वगैरे तर्कशून्य अर्थ कवितेतील प्रतिमांना बहाल केले आहेत.काही समीक्षक ही कविता अपूर्ण लिहिलेली मानतात परंतु अन्य समीक्षकांच्या या 'भटकेगिरीत' सामील ना होता मी या कवितेचे आणि अन्य कवितांचे मला भावलेले विश्लेषण केले आहे.
'सौंदर्यचि काव्य’ ही काव्याची व्याख्या करणारे कवी 'बी’ म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते [जून १, १८७२-ऑगस्ट३०,१९४७) म्हणतात,”अंतरंग ओथंबुन ओसंडे ती सुंदरता.” त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इत्यादि नानाविध विषयांवर कविता केल्या.त्यांच्या प्रसिद्धीपराङ्‌मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते. कवी ‘बी’ यांनी एकूण ४९ कविता लिहिल्या. 'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून ‘पिकले पान’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह.त्यात ११कविता होत्या.त्यांची 'चाफा बोलेना, चाफा चालेना' ही अंतरंग ओथंबून ओसंडणारी सुंदर कविता अजूनही रसिकांना प्रिय आहे.
कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील एक बहुमुखी प्रतिमा-सम्पन्न कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते.त्यांनी कवितेत साकार केलेली पृथ्वी आणि सूर्याची पुरातन अजरामर रम्य प्रेमकथा ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
सुधीर मोघे [८ फेब्रुवारी, इ.स.१९३९-१५ मार्च, इ.स.२०१४] सुमारे ५० हून अधिक चित्रपटांचे गीतलेखन करणारे आणि ६ कविता संग्रहाचे लेखन करणारे लोकप्रिय कवी यांची एक सुंदर कविता ‘रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा’ मधील चांदण्या गूढ असूनही रम्य आहेत.
आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३- डिसेंबर ७, १९४१) एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी म्हणून त्यांचे अर्वाचीन कवींमधील स्थान फार वरचे आहे.ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते.’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांच्या कविता सन १९३५ मध्ये प्रकाशित झाल्या आहेत.त्यात एकुण २२५ कविता आहेत.या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत.गान सम्राज्ञी लता मंगेशकर तांबे यांच्या कवितांबद्दल म्हणतात की ग्वाल्हेरचे राजकवी असलेले भास्कर रामचंद्र ऊर्फ भा. रा. तांबे, माझे अतिशय आवडते कवी.माझ्याकडे त्यांच्या कवितांचं पुस्तक होतं.त्यातल्या अनेक कविता मी लहानपणी गुणगुणत असे.त्यांच्या कवितेतला नाद, त्यातली लय आणि गेयता मला भुरळ घालत असे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कवितांमधला आशय मला सतत खुणावायचा.तांबे यांच्या कवितांतले शब्द तर सुंदर होतेच, मात्र त्या शब्दांना अनेक अर्थछटा होत्या.वरवर सरळ साध्या आणि सोप्या वाटणाऱ्या त्यांच्या कवितेच्या गर्भात काही गूढ दडल्यासारखं वाटायचं.मला वाटतं, तेच मला खुणावायचं. म्हणूनच मी त्यांच्या काही कविता गाणीरुपात गायचा निर्णय घेतला.
तांबे यांच्या गूढतेकडे कळलेल्या 'घन तमीं शुक्र बघ राज्य करी ' , रिकामे मधुघट' आणि 'कशी काळनागिणी' या कविता या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.
मराठी साहित्यात विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घालणाऱ्या गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर' (२३ऑगस्ट १९१८-१४ मार्च २०१०) यांच्या गूढतेकडे वळणाऱ्या कविता एक नवा अनुभव रसिकांस देतील.
मराठी साहित्यास अनेक सुंदर भावकविता कविता लिहून समृद्ध करणाऱ्या प्रतिभासंपन्न कवियित्री इंदिरा संत [४ जानेवारी१९१४-१३ जुलै २०००] यांनी पन्नास वर्षांच्या अवधीत नऊ स्वतंत्र कवितासंग्रह रसिकास दिले.त्या म्हणतात "माझ्या  बहुसंख्य कवितांतून प्रीती आणि निसर्ग यांनाच अभिव्यक्ती मिळाली आहे.निसर्ग सुद्धा पुष्कळदा निसर्गासाठी आला नसून प्रीतीच्या अभिव्यक्तीसाठी आलेला आहे." त्यांच्या ४ प्रसिद्ध कविता ‘मृण्मयी’,‘कुब्जा’, ‘किती लुटावे डोळ्यांनी’ आणि ‘आषाढ’ यांचे रसग्रहण एका वेगळ्या स्वरुपात या पुस्तकात आपणास दिसेल.
शांता शेळके (ऑक्टोबर१२, १९२२-जून ६, २००२) या बहुमुखी प्रतिभा संपन्न लेखक आणि मराठी कवयित्री यांनी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले परंतु कविता हा त्यांच्या आवडीचा साहित्य प्रकार होता.या पुस्तकात सम्मिलित केलेल्या त्यांच्या वेगळ्या धर्तीच्या ३ कविता रसिकास त्यांच्या भावविश्वाचा निराळाच अनुभव देतील.
अरुण कोलटकर [१नोव्हेंबर१९३२-२५ सप्टेंबर २००४] हे कोल्हापुरात जन्मलेले एक सर्जनशील कवी आणि कलाकार होते.त्यांनी मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता केल्या. मर्ढेकरांप्रमाणे यांच्या कवितेनेही आधुनिक मराठी कवितेला एक नवे वळण मिळवून दिले. ‘भिजकी वही ' या काव्यसंग्रहाला त्यांना २००५ चा साहित्य अकादमी अवार्ड मिळाला होता. त्यांच्या कवितांचं एक वैशिष्ट्य असे की त्यांच्या कविता सहज बोलल्यासारख्या साध्या असतात परंतु कोलटकरातला सुप्त कलाकार कवितेतच एक गूढ अर्थ दडलेले चित्र रेखाटून आपणास बुचकळ्यात टाकतो. त्यांच्या ' भिजकी वही', 'आरसे' आणि 'वामांगी' या ३ प्रातिनिधिक कविता पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत आहेत.
मराठी साहित्याच्या या नवीन कालखंडातील खालील प्रतिभावंत कवी आणि कवयित्रींच्या रचना आणि माझ्या पूर्वीच्या समीक्षेप्रमाणे वेगळेपण असणारे पृथगात्म रसग्रहण या पुस्तकातही आपणास सापडेल.
कवी- बा.सी.मर्ढेकर
१ पिपात मेले ओल्या उंदीर
२ पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी
३ अजून येतो वास फुलांना
४ नाही कोणी का कुणाचा
५ झोपलीं ग खुळीं बाळें
६ बन बांबूचे पिवळ्या गाते
७ बोंड कपाशीचे फुटे
८ आहे बुद्धीशी इमान
९ जगाचा लिप्ताळा
१० दवांत आलीस भल्या पहाटीं
११ जे अज्ञानांत जन्मले
१२ आग अंधाराची जीवा
१३ अंधाऱ्या जगाची
१४ फुटेल [होती वेडी आशा]
१५ ह्या गंगेमधि गगन वितळले
१६ शिवलिंग माझे लिंग
१७ पळापळातील जोर मनगटी
१८ वावडी वाह्यात माझी
कवी-पु.शि. रेगे
१९. त्रिधा राधा
कवी-आरती प्रभू
२० गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
२१ समईच्या शुभ्र कळ्या
२२ तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी
२३ ती येते आणिक जाते
कवी-बा. भ. बोरकर
२४ तव नयनांचे दल हलले ग !
२५ झिणि झिणी वाजे बीन
२६ नाही पुण्याची मोजणी
२७ झाड गूढ झाड गूढ
२८ लावण्य रेखा
२९ रस्त्यांत कोणसा आंधळा गातो
कवी-ग्रेस
३० केतकी दल
३१ नवी द्यूतकांता
३२ काळा घोडेस्वार
३३ सारंगा
३४ ज्ञानेश्वरीय वर्षा
३५ सूर्यास्ताचे पाणी- इथे गंगेपाशी
३६ अंधारांतून जात कुणीतरी गात पुढे क्षितिजाला
३७ पाण्याची भूल
३८ चाफा
बालकवी- त्र्यंबक बापुजी ठोंबरे
३९ औदुंबर
४० गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी
कवी 'बी' ऊर्फ नारायण मुरलीधर गुप्ते
४१ चाफा बोलेना, चाफा चालेना
कवी- कुसुमाग्रज
४२ पृथ्वीचे प्रेमगीत
कवी- सुधीर मोघे
४३ रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
कवी-विंदा करंदीकर
४४ ओशट रात्र, वषट प्राण
४५ भुते झाडांची
४६ डोळ्यातल्या डोहामध्ये
४७ वेडी
कवी- भास्कर रामचंद्र तांबे.
४८ घन तमीं शुक्र बघ राज्य करी
४९ रिकामे मधुघट
५० कशी काळनागिणी
कवयित्री-इंदिरा संत .
५१ मृण्मयी
५२. कुब्जा
५३. किती लुटावे डोळ्यांनी
५४. आषाढ
कवयित्री-शांता शेळके
५५ जाईन विचारित रानफुला
५६.हे रान चेहऱ्यांनचे माझ्या सभोवती
५७ घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे .
कवी- अरुण कोलटकर
५८ भिजकी वही
५९ आरसे
६० वामांगी

https://www.facebook.com/groups/1788863474722340/permalink/3251372801804726/




Post 1

गेले दयायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे-  कवी आरती प्रभू  
[माझ्या 'मराठीतील काव्यरंग' या नवीनतम पुस्तकातून]
प्रस्तुती - श्रीनिवास हवालदार   
गेले दयायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया
आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता
रात्र रात्र शोषी रक्त
आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा
 'नक्षत्रांचे देणे' ची पहिली ओळख एका दूरदर्शन वाहिनीवर बरेच वर्षांपूर्वी झाली. मराठीच्या  अनेक प्रसिद्ध कवी , संगीत नियोजक इत्यादिंच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल निर्मित केलेला हा धारावाहिक कार्यक्रम फार लोकप्रिय होता. त्यावरून असा अनुमान  केला की नक्षत्राप्रमाणे चमकणारे जे व्यक्ती समाजास भरभरून योगदान करतात त्यांना आपण ही काही देणे लागते. परंतु  'गेले दयायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे'  ही आरती प्रभूं ची संगीतबद्ध कविता बरेच वेळा ऐकल्यानंतरही त्यातील धागे दोरे माझ्या पूर्व अनुमानाशी तंतोतंत जुळत नव्हते. कविता कोणाला उद्देशून आहे, त्याला काय द्यायचे राहिले आणि नक्षत्रांशी त्याचा काय संबंध असावा या बद्दल काही स्पष्ट चित्र समोर येत नव्हते. तेंव्हा आकाशातील सुदूर नक्षत्रांशी जवळीक साधणे आवश्यक होते.अंतर्जालावर नक्षत्रांबद्दल खालील माहिती मिळाल्यामुळे आरती प्रभूंची कविता उलगडण्यास मदत झाली-   
     “ पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकुण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. उदा. १) अश्विनी- कुचला २) भरणी- आवळा ३) कृत्तिका- उंबर ४) रोहिणी- जांभूळ वृक्ष वर्षांतून एकदा तरी नक्की लावावी. आयुर्वेदानुसार संकटकाळी व तब्येत खराब झाली तर आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते.,” 
   आरती प्रभू आपल्या प्रिय व्यक्ती समोर आपल्या आपराधिक भावना आणि पश्चात्ताप  व्यक्त करत आहेत की माझ्या हलगर्जीपणा मुळे मी तुझ्या जन्मानंतर तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या जन्म नक्षत्राचा एक साधासा आराध्यवृक्ष ही लावून शकलो नाही आणि पालन पोषण करण्यासाठी वेळही देऊ शकलो नाही इतके वर्ष गेल्यानंतर आता मी इतका दरिद्री झालो आहे की तुझा संरक्षणासाठी माझ्याकडे वृक्षा ऐवजी फक्त काही कळ्या आणि ओली पाने शिल्लक आहेत.त्याने कदाचित तुझे प्राण वाचू शकतील.  
  मी तुझ्या भेटीसाठी हसत आलो होतो.मला माहित नव्हते की ही भेट शेवटचीच आहे. आणि आता दिवसरात्र मला पश्चात्तापाच्या अग्नीत जळावे लागणार आहे.मी आता पर्यंत दगडासारखा भावनाहीन होऊन तुझ्याशी वागलो हे शल्य मला रात्रंदिवस टोचत राहील
मला आता जाणीव होते आहे की माझ्या अशा भावनाहीन वागण्यामुळे बालपणामध्येच तुला अकाली मृत्यू येत आहे.


Sunday, June 12, 2022

post 3

शिवकल्याण राजा !! 🚩🚩

जेष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व महादेवाचे दर्शन घेतले. महाराजांनी सर्व श्रेष्ठ पुरुषांचे पूजन करून दक्षिणा व वस्त्रे अर्पण केली, आऊसाहेबांसह सर्वांचे आशीर्वाद घेतले. मातोश्री जिजाऊ डोळे भरून सोहळा पाहत होत्या, आज त्यांच्या शिवबाचा राज्याभिषेक होता, छत्रपतींच्या मातोश्री म्हणवून घेण्याचे भाग्य त्या माउलीला कर्तृत्ववान पुत्रामुळे लाभले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून, भरजरी शेला पांघरलेले राजे अद्वितीय तेजस्वी दिसत होते. राजा हा विष्णूचा अवतार अशी हिंदू धर्मात समजूत होती ती खरी वाटावी इतके तेज शिवरायांच्या मुखावर होते. सुवर्ण चौरंगावर महाराज व सोयराबाईसाहेब बसले, सप्तनद्यांच्या जलाने त्यांचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजांनी राजपोषाख चढविला, अंगावर भरजरी शेला घेऊन, उजव्या हातात श्री विष्णुंची मूर्ती घेतली, डाव्या हाताने खांद्याला लावलेले धनुष्य धरले, कुटुंबियांसह राजे राजदरबारी सिंहासनाकडे निघाले. त्यावेळी पहाटेचे साडेचार वाजले होते, सर्वत्र जल्लोष होता, दिवट्या व मशालींच्या सुवर्णप्रकाशात रायगड उजळून गेला होता. जिकडे तिकडे भगवे झेंडे, पताका, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या यांनी रायगड नखशिखांत सजला होता. राजे संथ पावले टाकीत, अभिवादन स्वीकारीत सिंहासनाच्या पायऱ्या चढतांना थबकले. क्षणभर त्यांना त्यांच्या जिवाभावाच्या सवंगड्यांची आठवण झाली. बाजीप्रभू, तानाजी, बाजी व इतर सर्वांच्या आठवणीने राजांना भरून आले. स्वतःला सावरीत त्यांनी सुवर्णसिंहासनाला वंदन केले व पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर आरूढ झाले. सगळीकडे एकच जल्लोष झाला, “क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराज शिवछत्रपती की जय” अशी घोषणा राजसभेत होताच जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धारा वाहू लागल्या. महाराज मातोश्रींना दंडवत घालण्यास अधीर झाले होते, ते मासाहेबांपुढे आले व अत्यानंदाने आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेविले. राजमातेने आशीर्वाद दिला “औक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशस्वी व्हा, रामराज्य करा, धर्मराज्य करा.” पन्नास वर्षांपासून जिजाऊ पाहत असलेले स्वप्न शिवबाने आज पूर्ण केले होते, मातेच्या ममतेचे पांग फेडून राजे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले होते. राजे सिंहासनावर आरूढ झाले व एकेकाने त्यांना शुभेच्छा देण्यास प्रारंभ केला. कविराज भूषण यांनी आपल्या खास शैलीत दरबारात आनंदकाव्य सादर केले. आता तेच काव्य स्वरसरस्वती लता मंगेशकर यांच्या आवाजातून ऐकतानाही अंगावर शहारे येतात. 

“इंद्र जिमी जंभ पर, वाडव सुअंभ पर  । 
रावण सदंभ पर, रघुकुल राज है ।। १ ।। 
पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है ।। २ ।।
द्रावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है ।। ३ ।।
तेजतम अंस पर, कान्ह जिमी कंस पर ।
त्यों म्लेंच्छ बंसपर, शेर सिवराज है  ।। ४ ।।

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले होते, विजय खेचून आणला होता. ही विजयश्री पाहून इतरांचा स्वतःवरील विश्वास वाढला. आज हीच विजयश्री आपण पुढच्या पिढीला देताना स्वतःला भाग्यवान असंच समजायला हवं. 

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याण राजा ।।

- सर्वेश 
छायाचित्र साहाय्य - पराग घळसासी


Thursday, May 26, 2022

post 7

हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोहही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करणे सोडणार नाही.
*
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. 
पण, एकच गोष्ट अशी आहे की 
जी एकदा हातातून निसटली की, 
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
 आणि ती असते..
      "आपलं आयुष्य"..
          म्हणूनच..
    ....मनसोक्त जगा..
*
डीडी क्लास : आपल्या आयुष्याची वही तीन पानांची असते. पहिल्या पानावर "जन्म" लिहिलेला असतो तर तिसऱ्या पानावर "मृत्यू"
मधलं पान कोरे असते 
ते म्हणजे आपले जीवन असते ! 
त्या कोऱ्या पानावर आपण आपल्या कर्माने काय लिहितो 
त्याचेच रिटर्न आपल्याला मिळतात !
त्या कोऱ्या पानातील किमान चतकोर भाग जरी 
इतरांच्या आनंदासाठी राखीव ठेवलात 
तरी तुमचं पूर्ण पान समृद्धीने भरून जाईल !
स्वानुभवाने सांगतोय 
बँक बॅलन्स पेक्षा फ्रेंड बॅलन्स महत्वाचा ठरतो !
तो ज्याचा जास्त 
तो जगेल मस्त !
ⓒधनंजय देशपांडे  (dd)

Saturday, February 26, 2022

बातमी

हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते  संस्थापक आहेत. तब्बल  १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने परवा आणखी एका ठिकाणी नवीन ऑफिसमध्ये 'गृह' प्रवेश केला. 
सॉफ्टवेअर कंपनी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे 'वेस्टर्न कल्चर'. पण Persistent त्याला अपवाद. सोबतचा हा फोटो पहा. भारतीय (हिंदू) पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून त्यांनी या नवीन ठिकाणी प्रवेश केला. या कंपनीत केवळ भारतीय म्हणजे हिंदू त्यातही मराठीच सणांना सुट्टी दिली जाते. म्हणजे नूतनवर्ष १ जानेवारी नाही, तर 'गुढीपाडव्याला' सुट्टी नक्की असते. ख्रिसमसला  नाही पण गणेशमूर्ती  स्थापना आणि विसर्जन या दोनही दिवशी सुट्टी असते. 
पुण्यातील हिंजवडीमध्ये ऑफिसचे ४ टॉवर आहेत त्यांना ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद अशी नावं आहेत. नळ स्टॉप जवळील ऑफिसच्या २ टॉवरला प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ पिंगल आणि आर्यभट यांची नावं आहेत. सेनापती बापट रोड च्या ऑफिस इमारतीला भगीरथ. तसेच इमारतीमध्ये आतल्या बाजूने  ठिकठिकाणी वेदातील संदर्भ भिंतीवर दर्शविलेले आहेत. 
केवळ हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ असं बोलून काही होत नाही. त्याचं श्रेष्ठत्व टिकवायला कृतीतून संदेश द्यावा लागतो आणि या कंपनीने तो वेळोवेळी दिलाय. या कंपनीतलं वातावरण मी जवळून अनुभवलंय (अडीच वर्ष काम केलंय ). अगदी लहान गोष्ट सांगतो , आयटी कंपनी असूनही इथल्या महिला सदस्य अगदी 'हळदी कुंकू' सारखा संस्कार सणही इथे मोठ्या आनंदाने साजरा करतात. सत्यनारायणाची पूजाही रीतसर घातली जाते.  हे सगळं करूनही Persistent ही आयटी क्षेत्रात एका वेगळ्याच शिखरावर विराजमान आहे. गेल्या तिमाहीत तब्बल १४९१ करोड रुपयांचा रेव्हेन्यू आहे. 
इथे काम करणारा हा 'कामगार' नाही तर Persistent परिवाराचा 'सदस्य' असतो. जगभर तब्बल १५ हजारहुन सदस्य असणाऱ्या या कंपनीची उलाढाल शेकडो कोटींमध्ये आहे. साधी रहाणी- उच्च विचारसरणी म्हणून रतन टाटा यांना आपण ओळखतो मात्र मराठमोळे आनंद देशपांडे सर हे तितकंच भावलेलं व्यक्तिमत्व. 
- Rohit Pawar  रोहित पवार (एक माजी सदस्य)


Friday, March 12, 2021

जगातील सर्वश्रेष्ठ आई'_ चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष

*_'जगातील सर्वश्रेष्ठ आई'_ चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष......!!*

      मागील संपूर्ण आठवडा विविध माध्यमातून महिलांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करीत काल ८ मार्च रोजी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी "जागतिक महिला दिन " म्हणून साजरा केला गेला. 'जागतिक महिला दिना'च्या निमित्ताने वर्तमानपत्र, सोशल मिडियांचे रकाने महिलांच्या गुणगौरवाने भरलेले होते. देशभरात त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्यात महिलांना शुभेच्छा देत अनेक पुरस्कार दिले व घेतले गेले. यासर्व पुरस्कार समारोहात वेगळा आणि त्याची दखल विविध वर्तमानपत्रांनी घ्यावी असा समारोह म्हणजे बेंगळुरू येथे संपन्न झालेला 'वेमपावर'. या समारोहात "बेस्ट माॅम आॅफ द वर्ल्ड " हा खिताब जाहीर करण्यात आला तो एका पुरुषाला. बेस्ट माॅम म्हटले की, ह्या पुरस्काराची मानकरी महिलाचं असेल असे वाटत असतांनाच तो एका पुरुषाला म्हणजेच पुणे शहरातील आदित्य तिवारी यांना जाहीर झाला.
       आदित्य तिवारी हे सिंगल पॅरेंट असून २०१६ मध्ये २२ महिन्याच्या अवनिशला त्यानी दत्तक घेतले. मुल दत्तक घेतांना कोणताही पालक सुदृढ बाळाची निवड करेल, पण आदित्य यांनी  चक्क डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली. डाऊन सिंड्रोम हा मुलांमध्ये मतिमंदत्व आणणारा आजार असतो. हा आजार असलेल्या मुलांना काळजीपूर्वक जपावं लागतं. अशा मुलाला एक सिंगल पॅरेंट म्हणून मोठा कायदेशीर आणि सामाजिक लढा आदित्यला द्यावा लागला व शेवटी त्याची ममता जिंकली. साधारण दीड वर्षाच्या संघर्षानंतर १ जाने. २०१६ रोजी आईने अनाथालयात सोडलेल्या अवनिशला आदित्यला घरी आणता आले. दत्तक कायदा व समाजाप्रमाणे त्याला घरातूनही विरोध झालाच. परंतू अवनिशला आईची कमतरता न भासू देणा-या आदित्यमधील ममता यासर्व विरोधांना बाळगणारी नव्हती.
        आदित्य तिवारी एका सुप्रसिद्ध आयटी कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. परंतू अवनिशचे पालकत्व स्विकारल्यानंतर त्याच्या काळजीपोटी त्याने नोकरीवर पाणी सोडत 'स्पेशल' मुलांच्या आई-वडिलांना मार्गदर्शन, समुपदेशन व त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. हे करत असतांना त्याला लक्षात आलं की, भारतात बौद्धिक अपंगत्वासाठी वेगळा विभागाचं नाही. सरकार अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्रही देत नाही. करीता आदित्याने आॅनलाइन याचिका दाखल केली. परिणामी आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला असून अशा मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात यायला लागली आहेत.
      'सिंगल पॅरेटिंग' हे काही लिंग आधारित काम नाहीच असे म्हणणारा आदित्य त्याच्या या प्रवासाबद्दल, " ईश्वराने दिलेल्या भेटीमध्ये तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ भेट आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो." असा सहज साक्षात्कारात बोलून जातो. आदित्याने स्वत:ला कधीच कोणत्याही भूमिकेत टाकण्याचा प्रयत्न केला नाही...ना आई, ना बाबा... तो नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करीत होता. एक चांगला पालक कसे बनायचं हे अवनिशने 'एक पालक' म्हणून आदित्याचा स्वीकार करीत शिकवलं.
        आजपर्यंत आदित्य आणि अवनिश यांनी मिळून २२ राज्यांची सफर केली असून जवळजवळ ४०० ठिकाणी कार्यक्रम व कार्यशाळा घेतल्या आहेत. याखेरीज ते जगभरातील दहा हजारांहून अधिक पालकांशी जोडले गेले आहेत. मानसिकरीत्या असमर्थ असणा-या मुलांचा सांभाळ करण्याच्या पध्दतीबद्दल बोलण्यासाठी आदित्यला संयुक्त राष्ट्राच्या एका संमेलनात विशेष आमंत्रित करण्यात आले होते. केवळ एक महिलाच बाळाचा सांभाळ करु शकते अशी आपल्याकडे मान्यता असतांना आपल्या 'स्पेशल' मुलाचा आदित्याने, एका सिंगल पॅरेंटने काळजी घेतली आणि म्हणूनच आदित्य तिवारींच्या या कर्तुत्वाची दखल घेत नुकत्याच पार पडलेल्या बेंगळुरु येथील वेमपावर या 'जागतिक महिला दिना'च्या समारोहात "जगातील सर्वश्रेष्ठ आई " या खिताबानं एका पुरुषाला गौरविले.

✒ नरेंद्र गायकवाड.

Tuesday, April 21, 2020

लेख २

 "#एका_संन्यासाची_खरी_गोष्ट ".......!!!!
(योगी आदित्यनाथ महाराज) 
😪😪😪😪😪😪

आई !!! मला खरंच संन्यासी बनण्याची इच्छा आहे.
माझ्या जीवनाची सुरवात येथे होणार नाही......... मला माझा समाज मला आर्तभावातुन बोलवत आहे!
मला जायला लागेल आई!
कोणाला तरी अग्नीकुंडाची आहुती बनले पहिजे!

आई!!! तर तू कधीच माघारी येणार नाहीस का.......???

 दोघांत वडील आनंद रडत योगीना एक प्रश्न विचारतात - " जेव्हा मी मरत असेल तेव्हा, पण तू येणार नाहीस का "........??? 

बाबा, मी माझ्या कर्माने तुम्हाला तर्पण (संतूृष्ट)करेल. 

आज सरकारी वार्ताफलमध्ये(मिटिंग)असताना  वडिलांचे निधन झाल्याची बातमी  फोनवरून समजली तरीही पडक्या चेहरा घेऊन रडक्या  आवाजात मिटींगमध्ये कोरोना सबंधीत विषयावर सरकारी यंत्रेला आदेश देत होते....... आपल्या वडिलांच्या अंतिमसंस्कार पेक्षा आपल्या कर्तव्यास प्रथम प्रधान्य देत आपल्या जनतेचे हित लक्षात ठेवत आपल्या राज्याची सेवा 'दिवस-रात्र' योगी आदित्यनाथ करत आहेत........लॉकडाउननंतरच आपल्या घरातील सदस्याना ते भेटण्यास जाणार आहेत व त्याचबरोबर अंतिमदर्शनास जास्त गर्दी करु नये म्हणून ही आदेश दिला आहे........एकदा श्रीराम प्रभू सहज बोलले होते संतापेक्षा कोणताच राजा मोठा नसतो......... त्याचबरोबर एका राजाचे गुणवर्णन करताना सांगितले होते एका राजासाठी आपल्या घरातील सदस्यांपेक्षा प्रजाच (जनता)सर्वस्व असते......... आपल्या जनतेसाठी जो राजा आपले सर्वस्व त्यागण्याची क्षमता ठेवतो तोच सर्वश्रेष्ठ राजा असतो !

" #योगी_आदित्यनाथ_यांचे_वडिल_ आनंद_सिह_बिश्त_यांना_भावपुर्ण_श्रद्धांजली ".
            🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

   

✍️ लेखक :- रितेश राजाराम काळोखे.

लेख १

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला साष्टांग नमस्कार ! ! 
नमस्कार बंधूंनो,
आज एक खूप सुंदर अनुभव आला. संघ कार्याचा हा महिमा असेच म्हणावे लागेल.

विलेपार्ले ला एक ८५+ वयाचं मुजुमदार नावाचं जोडपं रहातं . त्यांच्या मुलीने त्यांना जेवणाचा डबा लावून दिला  आहे .डबा आणि इतर सहायता म्हणून एक नर्स लावून दिली आहे. इथे त्यांचं दुसर कोणी नाही. ५२ वर्षाचा मुलगा आहे पण तो अधू आहे.  मुलगी अमेरिकेत आहे.

कोरोना प्रकरणात डबा पोचला नाही, नर्स पोचली नाही म्हणून मुलगी काळजीत. तिने तिथल्या संघाच्या कार्यकर्त्याला काही मदत करता येईल का ते पाहावे असे सांगितले. ज्याला सांगितले तो अमेरिकेतील कार्यकर्ता माझ्या नागपूरच्या आदित्य नावाच्या एका स्वयंसेवक बंधूचा मित्र आहे. आदित्य त्याला म्हणाला," बघतो". आदित्य ने मला फोन केला की असं असं आहे काय करता येईल. त्याला सांगितले की मी बघतो. काल उशीर झाला होता, रात्री पावणे बारा वाजले होते, म्हणून पार्ल्या च्या कार्यकर्त्याचा नंबर कसा मिळवायचा ह्या विचारात असताना, तिकडे जर्मनी मध्ये फ्रॅंकफर्ट चा मुख्यशिक्षक, आदित्य नावाचाच  संघाचा एक कार्यकर्ता आहे जो की मूळ चा विलेपार्लेचा आहे त्याची आठवण झाली. शिवाय जर्मनी वेळेनुसार तीकडले संध्याकाळचे सव्वासातच झाले होते म्हणून त्याला व्हॉटसअप कॉल वर सांगितल की मला पार्ले च्या कार्यकर्त्याचा नंबर देऊन ठेव, अशी अशी मदत हवीये. त्याने नंबर दिला, श्री जयेश शाह पार्ले सहकार्यवाह. मी म्हंटलं," मी उद्या त्यांच्याशी बोलतो तू तूर्तास मेसेज पाठवून ठेव त्यांना".

आता आज त्यांना फोन करणारच होतो, तर त्यांचाच मला मेसेज आला की *काम फत्ते*. श्री दिलीप सोनी नावाचे पार्ल्याचेच स्वयंसेवक त्यांच्या घरा जवळच्याच सोसायटी मध्ये  राहतात. त्यांनी त्यांची जाऊन चौकशी केली आणि त्यांना आश्वस्त केलं. त्यांनी व्हिडिओ पण बनवून पाठवला.

विलेपार्ले...अमेरिका...नागपूर...दादर... फ्रॅंकफर्ट...विलेपार्ले अस वर्तुळ पूर्ण झालं.

मस्त वाटल. संघ स्वयंसेवकांचं जाळं किती मजबूत विणलं गेलंय ते पाहून धन्य वाटलं.

प्रद्युम्न गाडगीळ.

Saturday, April 18, 2020

"वरती" गेल्यावरही उत्तर देता यायला हवं !

"वरती" गेल्यावरही उत्तर देता यायला हवं !

**

सुश्री निर्मलाताई पुरंदरे 

उच्चस्तरीय पुरस्कारांकित व आयुष्यभर समाजभान जपणारे हे नाव. 

डोंगराइतकं काम उभं करूनही आयुष्यात त्यांनी कधीच कुणाला मुलाखत दिली नव्हती. प्रसिद्धीपेक्षा सिद्धी महत्वाची. असं त्यांच मत. 

मात्र जीवनात त्यांनी एकमेव मुलाखत दिली ती मला. "कर्तृत्वाला सलाम" या पुस्तकात मी काही उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा परिचय करून देण्याचं मिशन घेतलेलं. त्यासाठी मला ताईंची मुलाखत हवी होती. मलाही सुरुवातीला नकारच मिळाला. पण जवळपास पंधरा दिवस पाठपुरावा केल्यावर शेवटी त्या हसत हसत म्हणाल्या, "किती चिवट रे तू पण" 

आणि तब्ब्ल दोन अडीच तास मस्त मुलाखत दिली.  

यथावकाश त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी त्यांनाच निमंत्रित केलं. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात देखील माझ्या त्या एकूणच "चिवटपणाचा" उल्लेख पॉजिटिव्हली करून "ध्येय गाठायचे असेल तर असा चिवटपणा अंगी असावा" हे सर्वाना सांगितलं. 

तर त्यांच्या त्या मुलाखतीत त्यांनी इतके सुंदर विचार दिले की त्याचीच एक मोठी सिरीज होईल. पण एक विचार फारच आवडला. 

मी त्यांना विचारलं होत की, "घरी सगळं उत्तम, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेसारखे पती, माधुरी सारखी गुणवान गायिका / लेखिका मुलगी,. प्रसाद अमृत सारखी ध्येयवादी मुलं, हे सगळं करत करत किंवा याना प्रसंगी थोडं बाजूला ठेवून तुम्ही बाकी सामाजिक काम इतकं कसं करू शकला?"

तर त्या म्हणाल्या होत्या, "कसे आहे न की, देवाने आपल्याला इतके चांगले आयुष्य दिले, इतकी चांगली बुद्धी दिली. मग ती वापरली नाही तर काय उपयोग? इथलं सगळं आटोपून "वर" गेल्यावर त्याने जर विचारलं की, बाई ग, इतकं सगळं चांगलं आयुष्य दिल होत, काय केलं तू त्याच? तर मला त्या देवाला किमान एक तरी काम सांगता आलं पाहिजे."

समाजसेवेची हि अनोखी व्याख्या ऐकून मी निशब्द !

अजून एक असाच सुंदर विचार त्यांनी दिलेला (जो पुस्तकात पण मी लिहिला आहे)

मी विचारलं होत, "बाबासाहेब इतिहासात मग्न, तुम्ही वर्तमान व भविष्यकाळ घडवण्यात दंग. पण मग दोघेही जाहीर ठिकाणी कधीच पती पत्नी असा परिचय / उल्लेख करत नाही. असं का ?" 

त्या म्हणाल्या, "हे बघ धनंजय, रेल्वेचे दोन रूळ समांतर असतील तरच त्यावरून रेल्वे नीट धावेल न. रूळ एकमेकांना चिकटत बसले तर अपघात होईल. तसेच दोघेही आपापल्या कार्यात, विश्वात मग्न असतील तर उगीच एकमेकांच्या जगण्यात, कामात लुडबुड करू नये. जन्माला आलेला प्रत्येकजण तसाही स्वतंत्र येतो व जातो. मग उगीच पायात पाय कशाला?"

आजकाल अनेक घरात पती पत्नी दोघेही करियर करत असतील तर त्यापैकी ९०% घरात विसंवाद आणि काही ठिकाणी पराकोटीचा वाद झडत असतो. त्यांच्यासाठी निर्मलाताई किती छान संदेश देऊन गेल्या न ?

अंगणवाडीच्या माध्यमातून हजारो महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या "वनस्थळी" संस्थेच्या संस्थापक व जिथे मी घडलो वाढलो त्या विद्यार्थी सहायक समितीच्या ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय निर्मलाताई पुरंदरे, यांचे नुकतेच "वरती" प्रयाण झाले. त्यावरून मला त्यांचे हे विचार आठवले तेच तुमच्यासोबत शेयर केले. 

"पोरकं होणं म्हणजे काय?" हे मला पुन्हा एकदा जाणवलं. दोन वर्षांपूर्वी मातृछत्र हरवलं तेव्हा आणि आता निर्मलाताई गेल्यावर एकदा! कारण माझ्या हॉस्टेल जीवनात कायमच ताईंनी जणू आईची भूमिका घेतली. प्रसंगी कठोर तर प्रसंगी हळव्या होऊन जपलं. माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी असेच जपले. 

शेवटी शेवटी त्या आजारी असताना आम्ही भेटायला गेलेलो. थोडा विकनेस वाढल्याने विश्रांती घेत होत्या तरी स्मरणशक्ती तल्लख होती. समोर पाहताच म्हणाल्या, "आलास का रे बाबा, कसा आहेस? आता खोड्या कमी केल्यास न"?

अशा या निर्मलाताई. 

त्यांच्या कार्याला हि शब्दांची सुमनांजली !!

- धनंजय देशपांडे (dd)

*

फोटो : हाच तो पुस्तक प्रकाशन समारंभ (सर्वात डावीकडे आदरणीय निर्मलाताई)

(पोस्टमधील विचार आवडले असतील तर प्लिज शेयर करा, जेणेकरून त्यातून इतर अनेक घरातील विसंवाद कमी होऊन सुसंवाद सुरु होतील)

Friday, March 20, 2020

fb post 2

#फोटोकॉपी काढताना सावध रहा #fbpost

Aniruddh Datar
· Pune
आज आलेला अत्यंत फसवा अनुभव. बाकीच्यांनीही सावध व्हावं म्हणुन लिहितोय.
आज अचानक माझ्या एका कुप्रसिद्ध सरकारी बँकेत जायला लागलं. ८०'सी खाली गुंतवणुकीचा पुरावा म्हणुन एफ.डी. सर्टीफिकेट घ्यायचं होतं. आधी म्हणल्याप्रमाणे बँक कुप्रसिद्ध आणि सरकारी असल्याने एक जन्मकुंडली सोडुन सगळी डॉक्युमेंट्स साक्षांकित करुन दिलेलीचं होती. आणि बँकेच्या अत्यंत काळजीपुर्वक धोरणाला अनुसरुन पॅन कार्डची साक्षांकित प्रत हरवली गेली (पुढच्या वर्षीपासुन रिसिव्हड चा शिक्का मारुन घेणार). ऐन वेळेला हे लक्षात आल्यावर मला परत पॅन कार्डची छायाप्रत काढायसाठी बाहेर पळायला लागलं. आपल्याला हवा तेव्हा एक झेरॉक्सवाला सापडेल तर शपथ. 
शेवटी एका जवळच्या गल्लीबोळात एक झेरॉक्स कम चहा कम सिमकार्ड कम फोन रिचार्ज कम फॉल पिको कम परकर पोलकं कम अंडीविक्याचं दुकान सापडलं. त्याला दोन फोटोकॉपीज मागीतल्या. ह्यानी कॉपीज काढल्या आणि मशिनच्या मागच्या पिशवीमधे दोन कागद खुपसले. नेमके खुपसता खुपसता मला माझ्या पॅनकार्डची कॉपी खुपसली जातीये असा भास झाला. त्यानी माझ्या हातात माझ्या प्रती टेकवल्या. मला शंका आली म्हणुन मी त्याला पिशवी उघडायला सांगितली. तो उघडायला काही तयार होईना. म्हणे खराब झालेल्या प्रतिंची पिशवी आहे. माझी सटकली. गचांडी धरल्यावर त्यानी पिशवी उघडली. त्यामधुन माझ्या पॅनकार्डच्या दोन सुस्पष्ट प्रती निघाल्या. त्याचबरोबर इतर अनोळखी लोकांच्या पॅनकार्ड्स, ड्राईव्हिंग लायसन्स, वीजबिल वगैरेच्या जवळजवळ २५-३० प्रति होत्या.
त्याला नंतर कानाखाली आवाज काढणं वगैरेंचा नैवेद्य दाखवल्यावर पहिलं काम केलं म्हणजे त्याचं मशिन रिसेट केलं. त्याला माझ्यासमोर सगळे कागद फाडायला लावले. पोलिसात जायची धमकी दिली. गयावया करायला लागला म्हणुन आत्ता सोडुन दिलाय. आता परत तिकडे गेलो की मित्राला किंवा दुसर्या कोणालातरी प्रत काढायला पाठवणार. जर त्यानी परत तसाचं प्रकार केला तर तो गेला बाराच्या भावात.
लिहायचं तात्पर्य असं की ह्या अश्या दुकानामधे फोटो़कॉपीज काढताना सावधान. आपल्या कागदपत्रांचा वापर कुठल्या कामासाठी केला जाईल ह्याचा काय भरवसा? आपल्या नावाने सिमकार्ड्स उचलुन किंवा अजुन काही कारभार करुन आपण अडकले जाणार नाही कशावरुन? इथुन पुढे मी जास्तीच्या अनावश्यक प्रती काढणार नाही आणि रिसिव्ह्ड चा शिक्का मारुन घेतल्याशिवाय कुठेही देणार नाही. एवढचं नव्हे तर फोटोकॉपी मशिनवाल्यावर जास्तीचं लक्ष राहिल इथुन पुढं माझं.
ह्या सगळ्या प्रकारावरुन आधी घडलेल्या एका प्रकाराचीही आठवण झाली. एअरटेलला मी नंबर जवळ जवळ पाच वर्ष वापरल्यावर लक्षात आलं की माझी के.वाय.सी. डॉक्युमेंट्स हरवलीत ते. ही डॉक्युमेंट्स जमा नं केल्यास ४८ तासात फोन बंद करु असा नोटिसवजा फोन त्यांनी केला. एअरटेल सेंटर मधे ह्या प्रकाराची चौकशी करायला गेल्यावर तिथे माझ्यासारखेचं ४-५ जणं आलेले दिसले. आम्ही सेंटर मॅनेजरला के.वाय.सी. डॉक्युमेंट्स हवी आहेत हे लेखी मागितलं. ते द्यायला तो टाळाटाळ करायला लागला. मग गरमागरमी झाल्यावर त्यानी लेखी मागणी लिहुन ४-५ जणांना त्याच्या कॉपीज दिल्या त्यानंतरचं मी ते डॉक्युमेंट्स परत दिले. खरं खोटं माहित नाही पण एक अशी गोष्ट ऐकली होती की अमहाराष्ट्रीयन मंडळी ज्यांच्याकडे निवास पुरावा नसतो त्यांना ही कागदपत्र लागतात म्हणुन जाणुन बुजुन असे प्रकार केले जातात.
तेव्हा पुढच्या वेळी अशी महत्त्वाची कागदपत्र प्रत काढायसाठी द्याल तेव्हा नक्की डोळ्यात फोडणी घालुन लक्ष द्या. दिवस खराब आहेत. Nआपल्या कागदपत्रांचा बेजबाबदार वापर झाल्यास तुम्हालाचं जबाबदार धरलं जाउ शकतं.
प्रिव्हेंशन इज बेस्ट मेडिसिन.
Forwarded as received

fb post 1

#fbpost
बऱ्याच जणींना facebook कसे वापरावे ग्रुपवर कश्या पोस्ट्स टाकाव्यात कळत नाही ..त्यांच्यासाठी ही माहिती..

* तुम्हाला जर लिखाणाची आवड असेल तर facebook वापरा...

* facebook lite वर मोठ्या पोस्ट्स लिहता येत नाहीत.

* पोस्ट Copy paste करण्याचा ऑप्शन फक्त facebook वरच आहे.

* ग्रुपवरील पोस्ट सर्च करण्याचा ऑप्शन facebook आणि browser मधून facebook ओपन करून बघता येतात. facebook lite वर ग्रुपवरून सर्च करता येत नाही.

* play store मध्ये सेटिंग मध्ये Auto update apps on करून ठेवा म्हणजे अँप्सचे नवीन version update च्या नोटिफिकेशन येतात आणि अँप्स update करता येतात.

* मराठी टायपिंग साठी play store मधुन google indic keyboard किंवा Sparsh marathi keyboard install करा दोन्ही कीबोरर्ड्स सोपे आहेत दोन्ही डाउनलोड करा आवडेल तो वापरा दुसरा delete करा.

* एखादी पोस्ट लिहीत असताना वेळेअभावी पूर्ण लिहली जात नाही तेव्हा ही पोस्ट तुम्ही write something here वर लिहा आणि त्याच्या वरच share with चा ऑप्शन असतो तिथे क्लिक करून only me वर क्लिक करा आणि share करा म्हणजे तुमची पोस्ट फक्त तुम्हालाच दिसेल इतर कुणालाही दिसणार नाही. नंतर उजव्या कोपऱ्यात उभे 3 डॉट्स असतात त्यावर क्लिक करून edit post वर क्लिक करायचे आणि राहिलेल लिखाण पूर्ण करून save करायचे.
पोस्ट लिहून झाल्यावर save करून copy करून ग्रुप वर येऊन write something वर paste करून post करायचे.

* तुम्हाला एखादी पोस्ट आवडली असेल पण वेळेअभावी वाचता आली नाही तर वर उजव्या कोपऱ्यात जे 3 उभे dots आहेत त्यावर क्लिक करून save post वर क्लिक करा आणि वेळ मिळाल्यावर वर उजव्या कोपऱ्यात 3 आडव्या lines आहेत त्यावर क्लिक करून saved वर क्लिक करायचे आणि राहिलेलं वाचन पूर्ण करायचे.

* friend reqests स्वीकारताना आणि पाठवताना विचार करूनच निर्णय घ्या.बऱ्याचदा नावात साधर्म्य असेल तर request पाठवली जाते तेव्हा आधी प्रोफाइल बघूनच request पाठवा आणि स्वीकारा.

* अनोळखी लोकांच्या मेसेज ला reply देऊच नका कारण तुम्ही 1 reply दिला की पुढचा 2 रिप्लाय देणार..
संधीसाधू लांडग्यांची कमी नाही इथे..so beware..

* फोन सेटिंग मध्ये application management वर क्लिक करून running apps close करा..कारण आपण अँप्स जरी close केले तरी ही apps अंतर्गत run होत असतात त्यामुळे फोनमधील space कमी होते फोन hang होतो आणि व्हायरस शिरण्याची शक्यता असते.

* पोस्ट वर react होताना ईमोजी चा वापर विचार करून करा आणि आपण योग्य ईमोजी टाकलीय का याची खात्री करा. विनाकारण एखाद्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

अश्या रीतीने झुक्याचं व्यासपीठ वापरताना काळजी घ्या.☺

...सारिका...☺https://www.facebook.com/sarika.avasarenangare

Friday, March 13, 2020

श्रीरंग

श्रीरंगात रंगले
.
रंगले रंगात कितीदा,
पुसून गेले ते परी,
रंगवी तुझ्याच रंगी,
रंगपंचमी ती खरी।
अनंगरंगा मागणे हे,
हे मुरारी श्रीहरी,
रंगवी तुझ्याच रंगी,
रंगपंचमी ती खरी।
जीवनाचे वस्त्र हे,
भक्तिभाव हा उरी,
श्रीरंगात रंगले,
रंगपंचमी ती खरी।

हे मुरारी, श्रीहरी, तुझ्याच रंगात माझ्या जीवनाचे वस्त्र रंगव अशी आळवणी करावीशी वाटतेय. कोण तो श्रीहरी? खरंच असा कुणी आहे? मुळात मी कोण आहे? का मी रंगपंचमीची आणि तीही खऱ्या खऱ्या अपेक्षा करतेय?

खरंच कोण आहे मी? गोकुळातली कोणी गवळण? कोण होत्या गोकुळातल्या गवळणी आणि त्या श्रीकृष्णकडून रंगवून घेण्यात का स्वतःला धन्य मानीत? एकनाथ महाराज म्हणतात, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती।

होय! त्या श्रुती होत्या. नेती नेती म्हणत माघारी फिरलेल्या गोपींच्या रूपाने गोकुळात आल्या. रासक्रीडेच्या निमित्ताने त्या कृष्णाच्या सुखप्राप्तीचा अनुभव घेऊ लागल्या. रंगपंचमी खेळू लागल्या. त्यांनी लोकांना भक्तीची परमसीमा दाखवली. मधुरा भक्ती कशी असते ते दाखवलं. जीवनाचा आनंद परमेश्‍वराच्या सान्निध्यात कसा घ्यायचा ते दाखवलं. निसर्गाशी एकरूप होत एक एक सण, एक एक आनंदसोहळा कसा बनवून टाकायचा ते दाखवलं.
श्रीकृष्ण गोपींवर आनंदाचे नवे नवे रंग टाकायचा. त्याच्याखेरीज आनंदाची इतकी सुंदर रंगपंचमी कोण खेळणार? बघता बघता सर्व गोपगोपिकांना एकमेकांमध्ये कृष्ण दिसू लागायचा. त्याला आपल्या रंगाने ते रंगवू बघायचे आणि त्याच्याकडून आपल्याला रंगवू बघायचे इतकी सुंदर रंगपंचमी...

हे आनंदघना, त्या रंगपंचमीची आस लागलीय तशी रंगपंचमी अनुभवायचीय...!

क्षणैक रंगी रंगणे,
क्षणैक ते आनंदणे,
क्षणैक तो जल्लोष अन्‌,
क्षणैक सुख पाहुणे।
शाश्‍वताची ओढ ती,
अशी मनास लागली,
लुटुपुटीत रंगणे,
हौस आता भागली।
एकदाच रे हरी,
ओती रंग मजवरी
रंग रंग रंगू दे,
अंतरी निरंतरी...।

(सौ. शैलजा शेवडे)
.
.

Sunday, February 23, 2020

पत्र

प्रिय अबक ,
मला तुझे नाव माहित नाही . तुझे लिंग माहित नाही . तुझे वय माहित नाही . तुझे मासिक उत्पन्न माहित नाही . तुझे लाईफ स्टाईल माहित नाही . पण मला तू माहित आहेस ! मला तुझ्यातली नकारात्मकता माहित आहे . तुझी बदललेली मानसिकता माहित आहे . मला झाकलेला तू माहित आहेस . तुला मी माहित असायलाच हवा असे नाही . मी खुर्चीवर बसतो तेव्हा वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे असतो . खुर्चीवर नसताना अंकुर असतो . खरं सांगतो . . दोन्ही भूमिकांत मी आनंदी असतो . तसा तू मला दिसत नाहीस . सेल्फी मधे आनंद शोधणारी तू मला दमलेली दिसतेस . म्हणून तुझ्यासाठी थोडे शब्द . . 

आपण पैशाने खूप वाढलोय . आनंदाने किती वाढलोय हे कधी तू पाहिले आहेस ? बरं आपल्या आनंदी व्हायच्या संकल्पना या वर्षात किती बदलल्यात रे .. नवीन फोन ,शूज , गाडी , हॉटेल , फॉरेन ट्रिप , इन्व्हेस्टमेंट , नवीन डील , नवीन व्यवसाय याने आपल्याला आनंद मिळतो . सकाळी उपमा मस्त झाला होता म्हणून शेवटचं आनंदी तू कधी झाला होतास रे ? आठवतंय . . कट्ट्यासमोर आई असेल किंवा बायको . . स्वयंपाक सुरु असताना कुडमुडे पणा करत शेवटच्या गप्पा कधी मारल्या होत्यास ? आठवतंय . . नाही आठवत ! आपण आयुष्यात खूप पुढं आलोय . . जीवनात मात्र बकाल झालोय . तू महागड्या हॉटेल मधे जातेस , पब मधे थिरकतेस , दोन चार अल्कोहोल शॉट्स पचवतेस . . हे सगळं करून तू घरी काय नेतेस ? एकटेपणा . . तुझ्या एन्जॉयमेंट ला सोशल मीडिया वर २००-४०० लाईक्स नाही आले तर तुझा मूड जातो ! अजून लाईक्स यायला अजून धडपड , अजून मोठी जागा . . अजून चांगले फोटो . . ही धडपड  कधी संपणार गं ? या धडपडीचा भाग व्हायला का आपण मोठे झालो ?

तूला आठवतंय . . लहान असताना ,नंतर शाळेत जाताना रस्त्यावर सापडलेल्या फुलापासून ते कुत्र्याच्या पिलापर्यंत सगळं उचलून आपण घरी आणायचो . फुलपाखरं पकडायचो . हवेत भिरभिरणाऱ्या म्हातारीला पकडायला बेभान होऊन पळायचो . रुपयाला १६ या हिशेबाने मिळणाऱ्या मसाला , लिम्लेट च्या गोळ्या आनंदाने खायचो . आज हजारो रुपयांचे चॉकलेट फ्रिज मधे पडलेले असतात पण उत्साहाने खायची भावना होत नाही . का ? आपला उत्साह कोठे हरवलाय ? एका फोटोत एक कपडा आला की आपला त्यातला इंटरेस्ट संपतो . . दरवेळी नवीन कपडा आपल्याला लागतो . नात्यांचे पण असेच झाले आहे का ? अल्टर आणि रफ़ू करणारी पिढी भिकारी नव्हती रे . . त्यांच्या भावना प्रत्येक धाग्यात अडकल्या होत्या . आपले तागे आणि आपले धागे खूप क्षणभंगुर आहेत . शिलाई खूपच तकलादू . . आपले कपडेही लवकर खराब होतात आणि नातीही . . . आपण सतत नवीन शोधत असतो . . कपडाही नातेही . . 

नवीन काय नसतं अरे . . तुझ्या टेबल वरचा पेन स्टेन्ड तू उजवीकडून डावीकडे ठेवलास की टेबल नवीन होते . केसांची बट तू मोकळी सोडलीस की तू नवीन होतेस . चेहेऱ्यावरचे भाव बदलेलेस की तू नवीन होतोस . यात शून्य खर्च आहे . पण तू बदलत नाहीस . तू अडकला आहेस .एका सोन्याच्या पिंजऱ्यात . तुला वाटणाऱ्या सोन्याच्या पिंजऱ्यात . ज्यात प्रवेश सहज होतो . सुटका होत नाही . तू शेवटची आनंदी कधी होतीस ? याच्या आठवणी तुला फारतर कॉलेज पर्यन्त नेतील . . त्या नंतर आपण व्यवहारी झालो . आपण हसायला सुद्धा 'मॅनर्स' ने लागलो . खरं सांगू . . इथंच आपण संपलो . आपल्या प्रत्येकाकडे सांगायला भरपूर आहे पण ऐकायला कोणीच नाही . . का ? आपले कान आणि मन फार लवकर बोअर होते . . आपण सगळेच खूप मोठे ओझे ओढत आहोत . . सतत . . 

शाळेचे दप्तर कधीतरी रिकामे व्हायचे . . मनाचे दप्तर कधी रिकामे होणार ? उसवलेल्या नात्यांचे हिशोब तू मनात करत राहतेस . हुकलेल्या संधींची गणिते तू मनात सोडवत बसतोस . . त्याची उकल कधीच होत नाही . प्रश्न अजून गुंतागुंतीचे होतात . नात्यात करिअर येते . करिअर मधे नाते येते . तुला भरपूर पैसा मिळवायचा आहे . पैसा आपल्या मागील पिढ्यानी मिळवलाच नाही का ? अर्थात त्यांची स्वप्नं कधी आयफेल टॉवर खाली वाईन चे ग्लास पकडून किंवा किस करतानाचे फोटो काढण्याची नवती . सुट्टी म्हणजे नरसोबावाडी ,औदुंबर , पन्हाळा टोक म्हणजे महाबळेश्वर यातच संपली . ते या ठिकाणी जाऊन रिफ्रेश होत राहिले . तू अमेरिका पालथी घालून कधी जेट लेग तर कधी दमलो म्हणून झोपून राहिलास . . खरं सांग . . सुखाची बेरीज कोणी केली ?

मी पैसा मिळवूच नकोस म्हणत नाही . पैशा सोबत जरासे समाधान सुद्धा मिळव. थोडासा आनंद मिळव. थोडीशी शांतता मिळव .तुला एकटं राहायची भीती वाटते . . तुला संडासात पेपर लागतो , गाडीत एफ एम लागतो , बस मधे व्हाट्सअप लागतो . . का ? तुझ्यासमोर मोठा प्रश्न आहे . . मोकळं बसून करायचं काय ? खरं आहे . . आपण मोकळं बसून करणार काय ? आठवून आनंदी व्हावे असं आपल्याकडे आहे काय ? आपण बकाल आहोत . . . आपली ओळख फसवी आहे . आपल्या भावना आणि भावनांची गुंतवणूक तात्पुरती आहे . . यावर तू कधी विचार करणार आहेस ?? किंवा कधी विचार करुही नकोस . . त्याची काहीच गरज नाही .

तू जेव्हा माझ्या समोर खुर्चीत बसतोस /बसतेस तेव्हा तुझा एकटेपणा मला जाणवतो . तुझी तक्रार वेगळी असते .  पण वेदना खूप खोलवर कोठेतरी असते . तुझे महाग कपडे , बाहेर थांबलेली चार चाकी , इंपोर्टेड घड्याळ , ओपीडीत पसरलेला तुझ्या परफ्युम चा मंद वास , तुझा बेस्ट ब्लेझर , कडक सन ग्लासेस , कल्पनेच्या पलीकडची महागडी चेष्मा फ्रेम , खिशातून डोकावणारे सोन्याचे कोटिंग असलेले पेन इत्यादी इत्यादी च्या पलीकडचा तू मला दिसतोस . घुसमटलेली तू मला दिसतेस . . शुष्क . . कोरडी! हे बघून मला वाटतं . . तुझ्या हातावर खडीसाखरेचा एखादा मोठा खडा ठेवावा , एखादा चिरमुऱ्याचा लाडू द्यावा , गुळाचा खडा द्यावा , रावळगावचे एखादे चॉकलेट द्यावे पण . . . . या गोष्टी हातावर पडल्या की लहानपणी जसे आपण खुलायचो तसे आता आपण खुलणार नाही . हातावरच्या गुळाच्या आनंदापेक्षा चिकट तळहात कसा साफ करायचा . . रुमाल खराब होईल आणि इथे टिशू तर दिसत नाही या भयंकर समस्येत तू गुरफटणार म्हणून मी कधीच काही देत नाही . . . तू आनंदात रमण्यापेक्षा समस्येत गुरफाटायची सवय मनाला लावली आहेस . . . . यावर तू निरुत्तर आहेस . मी हतबल !! 
---
वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे 
एम डी (आयुर्वेद )
सांगली -पुणे 
7276338585
https://www.facebook.com/ankur.deshpande4444

Wednesday, February 5, 2020

श्रद्धांजलि


केवळ श्रद्धांजली वाहण्याकरता हत्तींचा एक कळपच्या कळप वीस किमीचा प्रदीर्घ प्रवास करून त्यांच्या घरी आला. 
पण, त्यांना त्यांचा मृत्यू झाल्याचं कळलं कसं असेल? 
कुणी आणि कसं सांगितलं असेल?
मनुष्यमात्राच्या समजुतीच्या बाहेरच्या अतार्किक अशा काही गोष्टी ह्या जगतात आहेत काय?

लॉरेन्स अँथनी म्हणजे दक्षिण आफ्रिकेत आता एक लोककथा बनून राहिली आहे. लॉरेन्सनी आतापर्यंत ३ पुस्तक लिहिली आहेत. त्यापैकी The Elephant Whisperer हे एक होय. वनचर प्राण्यांना वाचवून त्यांनी जगभर त्यांच्या पुनर्वसनाचं मोठंच कार्य केलं आहे. २००३ मधील अमेरिकेच्या आक्रमणातून बगदाद प्राणि संग्रहलयातील वाचवण्याचं धाडसी काम त्यांनीच केलं. मार्च ७, २०१२ ह्या दिवशी लॉरेन्स मरण पावले. त्यांच्या माघारी त्यांची पत्नी आणि दोन नातू आहेत. आणि त्यांचे सखे… शेकडो हत्ती!

त्यांच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी ३१ हत्तींचा एक कळप, दोन पुढारी हत्तिणींच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मागोमाग त्यांच्या घरी आले. आणि त्यांनी आपल्या प्रिय मानव-मित्राला अखेरचं निरोपाचं वंदन केलं. त्या अखेरच्या निरोपाकरता द. आफ्रिकेतील त्यांच्या घरी पोचायचं म्हणून त्या ३१ हत्तींनी अत्यंत शांतपणं, थोडाथोडका नव्हे तर २० किलोमीटरचा प्रवास केला.

ते विलक्षण दृश्य पाहून आसपासचे लोक थक्क झाले. केवळ त्या हत्तींनी दाखवलेल्या अफाट बुद्धित्तेमुळंच नव्हे. तर लॉरेन्स यांचा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलं तरी कसं ह्यामुळं, हे स्थान त्या हत्तींच्या लक्षात राहिलं कसं ह्यामुळं आणि हत्तींच्या कृतज्ञतेच्या भावनेमुळं लोकांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. पुन्हा इतक्या शिस्तशीरपणं अगदी एका रांगेत चालत येणं त्यांना कसं जमलं असेल, ते कोण सांगणार!

लॉरेन्सची पत्नी फ्रान्स्वाज (Francoise) अगदी हेलावून गेली. कारण, गेल्या तीन वर्षांत ते हत्ती त्यांच्या घरी एकदाही आले नव्हते! तरीही आपण कुठं जात आहोत, ह्याची त्यांना नेमकी माहिती होती. आपल्याला संरक्षण देणाऱ्या आपल्या मित्राला अखेरची मानवंदना देण्याकरताच केवळ त्यांनी हा प्रदीर्घ प्रवास केला होता. 
तसेच आदरांजली वाहण्याकरता दोन दिवस आणि दोन रात्री ते सगळे हत्ती काहीही अन्नपाणी वर्ज्य करून घराच्या अंगणात बसून राहिले. आणि दोन दिवसांनंतर आले तसेच परत गेले.

कुणाही माणसाच्या समजशक्तीच्या आवाक्यात न येणारी ही सत्यकथा वाचून आपलंही मन भरून आल्याविना राहणार नाही.

या बातमीचा स्त्रोत...
: http://www.nativevillage.org/

Source : fb 

Friday, January 24, 2020

संवाद


तात्याराव: आपल्याला स्वत:चं सैन्य उभं करणं फार गरजेचं आहे.

सुभाषबाबू: हो, ते आहेत. पण सध्या ते अशक्य वाटत आहे. 

तात्याराव: आपल्या तरुणांनी ब्रिटिशांच्या आर्मीत व पोलीसात समावेश करायला हवा.

सुभाषबाबू: का? त्याने काय होईल??

तात्याराव: वेळ आल्यावर त्यांच्या हातातील बंदूकीची नळी कोणाकडे करायची, ते ठरवता येईल. 

या एका वाक्याने खूप मोठा परिणाम झाला.

सुभाषबाबूंचे डोळे विस्फारले गेले. ते चटकन सावरकरांपुढे नतमस्तक होण्यासाठी वाकले. तात्यारावांनी त्यांचे दोन्ही खांदे धरले. डोळ्यात किंचित आनंदाश्रू तरळले. दोन्ही चेहरे प्रसन्न दिसत होते. गळाभेट झाली. दोन सुर्य जणू एक भासत होते.

याच दिवशी देशाच्या दोन्ही राष्ट्रभक्त तेजस्वी सुर्यांनी देशाचे भविष्य ठरविले. त्यांच्या योजनेने ब्रिटिशांची मस्ती तर जिरवलीच, पण आमच्याविना देशाचा तारणहार दूसरा कोण नाही; असे समजणा-या अहिंसावाद्यांचेही गर्वाहरण केले. 
अहिंसेच्या पुजा-यांना सुभाषबाबू आपल्या आझादहिंद सेनेसोबत अंदमानात दाखल होताच 'चले ज्जाव'ची घोषणा करावी लागली.

तात्यारावांची योजना फळास आली. ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलेल्या तुकडीने अखेर बंदूकीच्या नळ्या ब्रिटिशांच्याच दिशेने वळवल्या. आणि न भूतो 'अाझाद' हिंदचा विजय झाला!!

अश्या महान राष्ट्रभक्ताची आज जयंती!

'सुभाषबाबूंच्या पावन स्मृतीस त्रिवार अभिवादन'

"चला तनामनात सुभाषचंद्र जागवू"

©कल्पेश जोशी