Wednesday, June 24, 2020

शिक्षण

सगळीकडे  कसा आनंदी आनंद सगळे एकमेकांना प्रोत्साहन देताय ' सगळे सगळ्यांची काळजी घेताय , एकमेकांना समजून घेताय , त्यात काही अपवाद तर आहेच आणि नेहमीच असतात , ते कोणीच टाळू शकतच नाही ,
मग आता काय झाले ,नाही म्हणजे मी जे वरती लिहिले आहे ते अजून पण सगळे करतातच आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात।
प्रश्न असा आहे ।।
जीवन इतके सोपे झाले आहे का , जीवनाचे महत्व कमी झाले आहे का ,का आपण सगळे जीवनाचे महत्व अगदी रसातळाला नेऊन ठेवले आहे , विचार करण्याची गोष्ट आहे ,
माणसाचा जन्म किती योनी तुन गेल्यावर मिळतो माहीत नाही, अरे पण माणूस म्हणून जन्म झाला ना मग  का ।। त्या जन्माला पण काही भावना आहेत ,मोठे होण्याची जिज्ञासा आहे , प्रेम व्यक्त  करण्याची इच्छा आहे ।। आणि ते जीवन आपल्या  शरीराच्या रूपाने    आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे । 
मग का ,मग का आणि मग का ।।आपण त्याला आडवतो,
संकट सॉरी संकटे अजून पण त्सुनामी वेगाने येतील मग काय त्या जीवनाला संपवून टाकायचे ।।
इतके सगळे आपण कमजोर आहेत ।। नाही।।
विचार करण्याची क्षमता खूप खूप कमी झाली आहे ।। ती वाढवण्यासाठी कोण काय प्रयत्न करतोय , जो तो आपल्या तच busy । माझी कंपनी ,माझा boss माझे प्रमोशन माझे incerment माझे पैसे ,माझे प्रॉपर्टी ,अहो ते तर हवेच ।।पण वेळ ,वेळ वेळ दिलाच जात नाही ज्या गोष्टीला द्यायला पाहिजे।।।
आधी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे घरातल्या सगळ्यांना adjestment करायची सवय होती नकार पचवायची सवय होती आता विभक्त ,मला  हे पाहिजे म्हणजे पाहिजे ।। खर सांगू का नकार पचवायची क्षमता पूर्ण पणे संपली आहे , जो तो पाळतोय कुठे जातोय माहीत नाही।।
काल आमचा हिरो सुशांत ।।
काय कमी होते  त्याच्याकडे , उभारता कलाकार होता ,टॅलेंट होते ,पैसा भरपूर होता , मग का ।।
आहे त्या परिस्थितीत जगण्याची ।एन्जॉय करण्याची जीवन समृद्ध करण्याची , कला विकोपाला गेली असेच वाटते आता ।।
परीक्षांची निकाल लागतात तेव्हा हमखास  बातम्या येतात नापास झाला , कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या ।। कोण जबाबदार याला ।। आत्महत्या करणारा ,  आई बाबा ,की आजची शिक्षण पद्धती।। 
Positive रहा ह्याचे शिक्षण दिलेच जात नाही ।।
मनाचा कमकुवतपणा काढून टाका तुम्ही ग्रेट आहात तुम्ही ठरवले तर काहीही करू शकतात तुमच्यात शक्ती आहे तुम्ही ठरवले तर तीच पूर्व दिशा असेल असे का समजावले जात नाही, सांगितले जात नाही मन वळवण्याचा प्रयत्न का केला जात नाही ।।।
चूक कोणाची आपल्या सगळ्यांची आहे असे माझे मत आहे ।।
आता सरकार वर येतो नेहमी अभ्यासक्रम बदलत असतात ।।
मग।।
Depression । निराशा । एकटेपण वाटायला लागले ।। lost lost वाटायला लागले ।।
जीवन संपवण्याचे विचार डोक्यात यायला लागले ।। आणि अजून काही निराशात्मक त्याला अभ्यासक्रमात काही धडे आहेत का । नाही  नाही नाही ।।
हीच ती वेळ आहे, अश्या प्रकारचे शिक्षण लहानपणापासूनच द्यायला हवे असे नाही का वाटत ।।
 बुद्धी स्ट्रॉंग करा, संकटाला सामोरे जायची शिकवण  द्या ।। कठोर बनायला शिकवा
आणि हे सगळे अभ्यासक्रमात समाविष्ट करा ।।
बघा कसा फरक पडतो ।।
सगळे जग सुखी होईल ।।
लेखक
शेखर अरुण लोहकरे
9822329328
श्रीराम । 
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

0 comments: