Tuesday, October 7, 2025

post 1

व.पु.काळे.
निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता.. त्या सहजतेमधुन सुरक्षीतपणाची साय आपोआप धरते.. साय दुधातुन तयार होते आणि दुधावर छत धरते.. साय म्हणजे गुलामी नव्हे.. सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही.. मैत्री तशी असावी.. दुधापेक्षा स्निग्ध.. सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर-म्हणजे दही, ताक, लोणी, तूप- ही जास्त पौष्टिक असतात..तसं मैत्रीचं घडावं.. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्षबिंदु ठरावा....

0 comments: