Sunday, September 14, 2014

ही गुलामांची रोपं कोण करतंय विकसित ?


#काव्यतरंग #Marathi
● प्रयोजन ●
ही गुलामांची रोपं कोण करतंय विकसित ?
कोण करतंय वाहतूक ग्रंथामधून कधीची?
बजेटमधून रस्त्यात अर्थ नसलेल्या वस्त्यांत ?
हे दु:खी लोक अन् ह्या जाहिराती
हे चौकाचौकातील मड आयलंड्स
हे एक्सचेंज मेळावे अन् ढुंगण घोळावे
ही तृष्णा,हा सिकंदर,हा हिटलर , हा बुद्ध
तृष्णा नाहीशी झाली तर काय होतं
सोन्याचा आणि पाण्याचा भाव डाऊन होतो?
काय असतं आयुष्य ?
एक पंचांग ,एक कँलेंडर ,एक तारीख
मग मृत्यू काय एक्झिटचं गेट असतं कोलँप्सिबल
अन् सुरक्षितता
सुका काथ ,सातारी हरी-पत्ती
वर बंदुकीची एक गोळी
काय असतं अंतिम...
विचार ,तत्त्व की कपडेलत्ते
संध्याकाळ झाली की...
आपले हात आपल्या बटनांकडे जातातच !
कुणी अक्षर सुधारण्यासाठी
कविता लिहीत नसतो.
●कवी -अरुण काळे
(संदर्भ : नंतर आलेले लोक पृष्ठ १ /लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई .)
सौजन्य : Ramesh Mane

0 comments: